
मुंबई, 17 ऑक्टोबर – भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक 397 जागांवर दावा केला आहे.
1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला.
भाजपच्या राज्य युनिटने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ग्रामपंचायत निवडणुकीत 397 जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’चा एकत्रित आकडा ४७८ वर पोहोचला आहे.