महाराष्ट्र
Trending

देवेंद्र फडणवीस तुमचं पोलिस खातं पूर्णपणे करप्ट झालं, सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप ! स्थानिक पोलिस, पोलिस अधिक्षक, CID आणि आता SIT पुढे काय करणार ? तर ही केस CBI ला देणार !!

ज्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही ? याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा

Story Highlights
  • देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही.

मुंबई, दि. २- ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या गृह विभागावर सडकून ताशेरे ओढले आहे. संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून फडणवीस तुमचं पोलिस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे. तपासाच्या किती कमिट्या बदलणार असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.

यासंदर्भात ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, त्यात नमूद केले आहे की,  देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्य प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी चौकशी केली, त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर CID ने चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही. आणि आता चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे.

पुढे काय करणार ? तर ही केस CBI ला देणार !

देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही.

ज्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही ? याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा, असेही आंबेडकर यांनी सुनावलं.

Back to top button
error: Content is protected !!