महाराष्ट्र
Trending

आता भाऊकीमध्ये 200 रुपयांत शेतीचे वाटणी होईल ! महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा !!

NASHIK | आता भाऊकीमध्ये 200 रुपयांत शेतीचे वाटणी होईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेवून पाणंद रस्ते, रेती वाळू घाट, मुद्रांक शुल्क व जीवंत सातबारा यावर महत्त्वपूर्ण माहित दिली. ठळक मुद्दे खालील प्रमाणे.

•⁠ ⁠आज मी विभागीय आयुक्त कार्यलयात बैठक आणि महसूल बाबत आढावा घेतला
•⁠ ⁠मुद्रांक विभागाचा, मोजणी विभागाचा देखील आढावा घेतला
•⁠ ⁠जनसंवाद देखील मी आज घेणार आहे
•⁠ ⁠देवेंद्र फडणवीस यांच सरकार गतिमान सरकार आहे

•⁠ ⁠शासन निर्णय समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवणे काम आहे त्यामुळे प्रवास आणि संवाद कार्यक्रम सुरू आहे
•⁠ ⁠100 दिवसांचा जो टार्गेट दिला होता नाशिकने त्यात चांगले काम केले आहे
•⁠ ⁠आता 150 दिवसांचा टार्गेट दिल आहे
•⁠ ⁠20 लाख घरकुल मंजूर आहेत याबाबत थेट तहसीलदार यांना अधिकार दिले आहे
•⁠ ⁠5 ग्रास रेती थेट घरकुल मंजूर झालेल्या लोकांपर्यंत दिले जाणार आहे

•⁠ ⁠सातबारा वर ज्या नोंदी झाल्य़ा पाहिजे त्या झाल्या नाहीत
•⁠ ⁠जिवंत सातबारा योजना आम्ही सुरू केल्यात
•⁠ ⁠68 कलेक्टर आणि 80 अतिरिक्त कलेक्टर यांची नेमणूक झाली आहे
•⁠ ⁠आमच्या विभागात लवकरच प्रोमोशन देखील होणार आहे
•⁠ ⁠भाऊकी मध्ये 200 रुपये मध्ये शेतीचे वाटणी होईल
•⁠ ⁠पुढच्या काळात बोगस नोंदणी करता येणार नाही याबत योजना लवकरच आणणार आहे

•⁠ ⁠घरी बसून आणि आधार कार्ड वर नोंदणी करता येईल अशी व्यवस्था आणू
•⁠ ⁠यापुढे तुम्ही राज्यात कुठेही खरेदी केल्यास तिथे जाणायची आवश्यकता नाही
•⁠ ⁠तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणावरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे
•⁠ ⁠राज्यात पुढच्या तीन वर्षात बांधकामाला नैसर्गिक वाळूची गरज भासणार नाही
•⁠ ⁠दगडापासून वाळू तयार करण्याची यंत्रणा आम्ही देणार आहे
•⁠ ⁠प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर आम्ही देणार आहे
•⁠ ⁠1500 हजार क्रेशर आम्ही राज्यात देणार आहे. कुत्रिम वाळू यापुढे तयार केली जाणार आहे
•⁠ ⁠अवैध उत्खनन जिथे झाले आहे तिथे सर्वेक्षण करून दंड केले जाणार

•⁠ ⁠यापुढे टेकडी खोदण्याचे परवानगी दिली जाणार नाही
•⁠ ⁠डोंगर आणि टेकडी यापुढे कोणीही खोदणार नाही
•⁠ ⁠आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला देणार नाही
•⁠ ⁠लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधी दिला आहे
•⁠ ⁠कुठल्याही विभागाचा निधी दुसरीकडे वळवता येत नाही
•⁠ ⁠आदिवासी विभागाच्या निधी ला हात लावू शकता नाही कुठल्याही प्रकारचे जीआर काढले नाही
•⁠ ⁠लवकरच पंचनामे करू आणि नुकसान भरपाई देऊ

•⁠ ⁠पालकमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय होईल
•⁠ ⁠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री याबाबत लवकर निर्णय घेतील
•⁠ ⁠घटना घडल्यानंतर उशीर झाले तर आम्ही जवाबदार
•⁠ ⁠काही जण यात राजकारण करत आहेत
•⁠ ⁠घटना घडल्यावर सरकारने अकॅशन घेऊन कारवाई करत आहे
•⁠ ⁠आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे ही जवाबदारी सरकारची आहे

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Back to top button
error: Content is protected !!