
#devgirilive | Maratha Reservation | OBC Reservation | Kunbi Records | Chhagan Bhujbal | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Caste-wise Census | Manoj Jarange Patil | Jalna | जालना- छगन भुजबळ हे मंत्रीपदाचे भुकेले आहेत. भुजबळांना मंत्रिपद भेटलं आता बाकीचं सगळे वाऱ्यावर सुटणार अशी टीका मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे-
– राज्यात वाद हा फक्त छगन भुजबळ यांच्यामुळे चाललेला आहे
– छगन भुजबळ हे पदाचा भुकलेला माणूस आहे
– भुजबळांना मंत्रिपद भेटलं आता बाकीचं सगळे वाऱ्यावर सुटणार
– भुजबळांना खत पाणी घालणारे देवेंद्र फडणीस आहेत
– छगन भुजबळांना पुढे घालून वाद निर्माण करायचा आणि दंगली घडवायच्या, दूषित वातावरण करायचं हे देवेंद्र फडणीस यांची चाल आहे
– एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर देवेंद्र फडणीस यांनी खराब वेळ आणली आहे
– मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळांला मंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले
जनगणना मागणी
– ओबीसींचे दुसरे मोठे लीडर आहेत त्यांची मागणी होती जनगणनेची. परंतु, छगन भुजबळांना श्रेय घेण्याची सवय लागली आहे
– मराठा आणि ओबीसीत दंगली घडवण्यासाठी भुजबळांला फडणवीसांनी मंत्री केलं आहे
– अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस संपवायला लागले आहे
– ओबीसींनी आणि मराठ्यांनी छगन भुजबळांपासून सावध राहावं