
KALYAN- कल्याण तालुक्यात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या दमदार हजेरीनंतर उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली. आणि वाढलेल्या पातळीत वाघोली गावचे तीन गुराखी नदीच्या बेटावर अडकले. चारही बाजूने पाण्याची पातळी वाढलेली पाहून गुराखी घाबरले. आणि बचावासाठी गुहार टाहो फोडू लागले. किंचालण्याचा आवाज ऐकून मच्छीमार बांधवांकडून आपल्या बोटीच्या सहाय्याने या तीनही गुराख्यांना सुरक्षित काठावर आणण्यासाठी यश आले. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की बोट या पाण्यात तट धरू शकत नव्हती.
मात्र, या मच्छिमार बांधवांकडून जीवाची पर्वा न करता तीनही गुराख्यांना सुरक्षित काठापर्यंत आणण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताच ठाणे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना रेस्क्यू करणाऱ्या मच्छीमार बाप लेखांचा सन्मान करण्यासाठी सांगितले. त्यामुळे या बापलेकांचा सन्मान तहसीलदार सचिन सेजाल यांनी आपल्या कार्यालयात केला.
– कल्याण तालुक्यात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या दमदार हजेरीनंतर उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली. आणि वाढलेल्या पातळीत वाघोली गावचे तीन गुराखी नदीच्या बेटावर अडकले. चारही बाजूने पाण्याची पातळी वाढलेली पाहून गुराखी घाबरले. आणि बचावासाठी गुहार टाहो फोडू लागले. किंचालण्याचा आवाज ऐकून मच्छीमार बांधवांकडून आपल्या बोटीच्या सहाय्याने या तीनही गुराख्यांना सुरक्षित काठावर आणण्यासाठी यश आले.
पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की बोट या पाण्यात तट धरू शकत नव्हती. मात्र, या मच्छिमार बांधवांकडून जीवाची पर्वा न करता तीनही गुराख्यांना सुरक्षित काठापर्यंत आणण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताच ठाणे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना रेस्क्यू करणाऱ्या मच्छीमार बाप लेखांचा सन्मान करण्यासाठी सांगितले. त्यामुळे या बापलेकांचा सन्मान तहसीलदार सचिन सेजाल यांनी आपल्या कार्यालयात केला.