धोकादायक इमारतींवर धडक मोहीम सुरू, ठाकुर्लीतील ‘अनुसूया’ इमारत पोलिस बंदोबस्तात रिकामी करून सील

KALYAN | पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींवर कारवाईची मोहीम राबवत आहे. याच अनुषंगाने ठाकुर्ली परिसरातील ‘अनुसूया’ इमारत, जी धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते, ती शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात रिकामी करून सील करण्यात आली.
पालिकेकडून वेळोवेळी धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या जात असल्या तरी काही रहिवासी आपली घरे रिकामी करत नाहीत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात जीवितहानी टाळण्यासाठी, पालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशाच कठोर कारवाईचा भाग म्हणून काल पालिकेचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. ठाकुर्ली मधील अनुसूया इमारतीत मालक स्वतः राहत होते. पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सामान बाहेर काढून घर रिकामे करत टाळे ठोकून सील करण्यात आले.
याचबरोबर इमारतीतील चालू असलेली दुकानेही बंद करून सील लावण्यात आली. ही कारवाई आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशावरून, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले की, “धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्यांना नोटीसा बजावल्या जात आहेत. जी इमारती नागरिक रिकाम्या करत नाहीत, त्यांच्यावर थेट कारवाई करून सील करण्यात येत आहे