महाराष्ट्र
Trending
जालन्यातील बेपत्ता तिन्हीही मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, जाफ्राबाद वरुड गावातील घटना

JALNA | – जालन्यातील वरुड येथील बेपत्ता तिन्हीही लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. वरुड गावातील शेततळ्यातच ही घटना घडली आहे. हे तिन्हीही मुलं महादेव मंदीरात दर्शनासाठी जातो म्हणून घराबाहेर पडले होते.
काल रात्री पर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या शोध सुरु झाला होता.14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहण जोशी आणि 9 वर्षीय दिपाली जोशी अशी शेततळ्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नाव आहेत. हे तिन्हीही मुलं एकाच कुटुंबातील असून, या घटनेमुळे वरूडसह परिसरात शोककळा पसरली आहे.