महाराष्ट्र
Trending

मंत्री धनंजय मुंडेंना करावी लागू शकते जेलवारी, नाव न घेता आ. सुरेश धस यांनी साधला निशाणा ! म्हणाले, मारहाणीचा व्हिडियो पाहिला असेल तर आकाचे आका करलो जल्दी तयारी हम निकले है जेलवारी !!

परभणी, दि. ४ – हा जो काही आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे. पण जर आकाच्या आकानं जर काही झंटू फंटू केलं असेल तर आकाच्या आकाचासुद्धा नंबर लागू शकतो. यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीनं तुम्ही संतोष देशमुखला मारलं. ही कुठली पद्धत आहे. इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजांना ज्या पद्धतीने मारला होत अतिशय हाल हाल करून हा इतिहास आहे. मी इथे बरोबरी करत नाही. करू शकणार नाही कारण आमचे  छत्रपती संभाजी राजे यांनी अठराशे लढाया जिंकल्या एवढंच नाही तर बारा हत्तीचा बळ ज्याच्या भुजांमध्ये होतं. तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता. मी छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही. परंतू आमच्या लंकरानं (संतोष देशमुख) तुमचं काय बिघडलं होतं फक्त एका दलीत समाजाच्या पोराची बाजू घ्यायला संतोष भय्या देशमुख गेला होता. बाजु घ्यायला गेला म्हणून मारला. जर तो संतोषच्या मारहाणीचा व्हिडिया आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल पण आकाच्या आकाला दाखवला असेल अन् त्यानं जर पाहिला असेल तर आकाचे आका करलो जल्दी तयारी हम निकले है जेलवारी, असा हल्लाबोल आमदार सुरेश धस यांनी केला. परभणीत धस यांनी खंडणी आणि हत्या प्रकरणावरन आरोपींचे वाभाडे काडून राजकीय आश्रयदात्यांनाही फैलावर घेतले.

मूक मोर्चाला संबोधीत करताना आमदार सुरेश धस म्हणाले, जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी या परभणीची ओळख आहे. अशा या परभणीचा मी 18 महिने पालकमंत्री राहिलेलो आहे. त्यामुळे परभणीबद्दल मला चांगलीच माहिती आहे. दरम्यान, परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यास पोलिसांनी कोंबीग ऑपरेशन मध्ये नेलं आणि त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचे ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबाने घेतलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबीयांना वेळ देणार आहे वाकोडे साहेबांच्या कुटुंबाला वेळ देणार आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना सुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची सात तारीख होऊ शकते एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो.

आमचे बीडावाले जे काही कलाकार मंडळी आहे. स्वर्गीय संतोष च्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती की आईजी लेव्हलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलेले आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयांची मदत या कुटुंबीयांना दिली पाहिजे तेही मान्य झालेले आहे. त्याच्यानंतर यातील एखादा आरोपी चुकून सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे. त्यामुळे यांना मकोका लागलाच पाहिजे. एकदा का मकोका लावला तर पाच चार वर्षे नमस्ते लंडन. पुन्हा हे माघारी येत नाही. आणि हा जो काही आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे. पण जर आकाच्या आकानं जर काही झंटू फंटू केलं असेल तर आकाच्या आकाचासुद्धा नंबर लागू शकतो. यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीनं तुम्ही संतोष देशमुखला मारलं.

ही कुठली पद्धत आहे. इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजांना ज्या पद्धतीने मारला होत अतिशय हाल हाल करून हा इतिहास आहे. मी इथे बरोबरी करत नाही. करू शकणार नाही कारण आमचे  छत्रपती संभाजी राजे यांनी अठराशे लढाया जिंकल्या एवढंच नाही तर बारा हत्तीचा बळ ज्याच्या भुजांमध्ये होतं. तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता. मी छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही. परंतू आमच्या लंकरानं (संतोष देशमुख) तुमचं काय बिघडलं होतं फक्त एका दलीत समाजाच्या पोराची बाजू घ्यायला संतोष भय्या देशमुख गेला होता. बाजु घ्यायला गेला म्हणून मारला.

जर तो संतोषच्या मारहाणीचा व्हिडिया आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल पण आकाच्या आकाला दाखवला असेल अन् त्यानं जर पाहिला असेल तर आकाचे आका करलो जल्दी तयारी हम निकले है जेलवारी.. असंसुद्धा तुम्हाला करावं लागेल. पण आज त्यावर मी बोलत नाही. आणि ते म्हणताहेत सो चुहे बिल्ली हज को चली असं म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं. अजितदादा क्या हुआ तेरा वादा… अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे… कायको इसको अंदर लिया ये अंदर लेनेका जैसा नही है संगीत दिघोळेपासून तर आमच्या संतोष देशमुखांपर्यंत हत्येची बेरीज केली तर अजितदादा जरा हिशेब करा. या हत्या कोणी घडवून आणल्या याच्यामागचा मास्टरमाईंड कोण, कोणी हे उद्योग केले, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा, आमच्या समाजालाच नाही तर इतर समाजाला काय वागणूक मिळते तिथं (परळी), काय वागणूक मिळते अठरा पगड जातीला,  जीव मुठीत धरून बसताय. दोनशे-पाचशे कुटुंब शहर सोडून चालले, असा आरोपही आमदार धस यांनी यावेळी केला.

 

Back to top button
error: Content is protected !!