
JALNA | – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद शाळा येथे रात्रीला पाऊस पडल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये तळ्याचे स्वरूप आले. या तुंबलेल्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, शाळेच्या प्रांगणातच पाणी तुंबलेले आहे.
मुलांसाठी जे शालेय पोषण आहार ज्या खोलीत बनवले जाते, त्या खोलीला वरती 4 ते 5 पत्रे जीर्ण झाले आहेत. व पत्राचा 3 ते 4 फुटाचा तुकडा पडलेला आहे. रात्रीचा जो पाऊस झाला, त्या पावसामुळे या खोलीमध्ये सर्व पाणीच पाणी साचल्यामुळे खोलीत असलेले सर्व सामान खराब झालेल आहे.
आता तिथे विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार बनवण्यात येणार आहे. कुठेतरी ह्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये जर प्रांगणामध्ये तुम्हाला पाणी व शालेय पोषण आहाराचे असलेली खोली याचा बंदोबस्त नाही केला, तर सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख जिल्हा परिषद शाळेत येथे उपोषण करणार आहेत.