तीन महिन्यात 46 लाख मतं कशी वाढवली त्याची माहिती द्या ! दम असेल तर निवडणूक आयोगाने माहिती द्यावी !!
बेईमानीने हे लोक निवडून आले आहेत - नाना पटोले

GONDIA |- लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती असं म्हटलं होतं. यावर आमदार नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी भाजपवर टीका केली. व हे बेईमानीने निवडून आलेले लोक आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
– निवडणूक आयोग आणि बीजेपी ची मॅच फिक्सिंग होती
– आणि ते मॅच फिक्सिंगच्या आधारावर जनमताचा विश्वासघात करण्याचे काम भाजप आणि महायुतीने केले आहे, हे सिद्ध झालं आहे
– बेईमानीने हे लोक निवडून आले आहेत, राहुल गांधींना जी भूमिका मांडली ती चूक नाही बरोबर आहे
– 4 महिन्यात 46 लाख मत वाढवले आणि याची माहिती देखील निवडणूक आयोग देत नाही
– सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख लाख मत कुठून आली त्याची माहिती द्यायला तयार नाही
– यांच्या मॅच फिक्सिंगने महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचं आणि लोकतंत्राची हत्या करण्याचे पाप भाजपने केलेले आहे
– 3 महिन्यात 46 लाख मतं कशी वाढवली त्याची माहिती यांनी द्यावी
– राज्याच्या जनतेची बेइमानी स्वतः भाजपने करावी आणि राहुल गांधी यांच्यावर आक्षेप घ्यायचा. स्वतः बेईमान लोकं आहेत हे भाजपचे
– राहुल गांधी सूर्य आहे, त्यांच्यावर थुंकालं तर यांच्याच (भाजपच वाल्यांच्या) तोंडावर पडणार
– दम असेल तर निवडणूक आयोगाने माहिती द्यावी, का लपवता माहिती? कोणाच्या दबावावर लपवता? त्या बेईमान लोकांनी राहुल गांधींवर टीका करायची यांची लायकी नाही