पत्नीचा मृत्यू दाखवण्यासाठी पतीचा लढा सुरूच
अश्विनीच्या मारेकरांना शिक्षा व्हावी यासाठी ९ वर्ष लढलो आता तिला मृत घोषित करून मृत्यू दाखवण्यासाठी लढावं लागतय - राजू गोरे

NAVI MUMBAI |सहाय्यक पोलिस अधीक्षक अश्विनी बिंद्रे – गोरे यांच्या आरोपींना शिक्षा झाली. परंतु अश्विनी हिचा मृतदेह सापडा नसल्याने घरचा मृत्यू दाखला मिळत नाही आहे. घटना मीरा भाईंदर ची असल्याचे सांगून पनवेल महापालिकेने दाखला दिला नाही. त्यामुळे अश्विनीचे पती राजू गोरे यांनी मीरा भाईंदर महापालिका आयुक्त आणि अपर तहसीलदार यांच्याकडे मृत्यू दाखल्यासाठी अर्ज केला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे – गोरे हिची ११ एप्रिल २०१६ मध्ये भाईंदर च्या न्यू गोल्डन नेस्ट मार्गावर मुकुंद प्लाझा इमारतींनी मध्ये हत्या करणाऱ्या पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली तसेच त्याची साथ देणाऱ्या कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अश्विनीची हत्या केल्या नंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले होते त्यामुळे तिची बॉडी सापडली नाही. राजू यांनी सांगितले की, आमची मुलगी आता १६ वर्षांची झाली आहे. तिच्या शिक्षणासाठी अश्विनीच्या विम्यासाठी तसेच इतरही कामांसाठी अश्विनीचा मृत्यू दाखल्याची गरज भासते. अश्विनीला न्याय मिळवून देण्यासाठी ९ वर्ष लढलो आता तिला मृत घोषित करून मृत्यू दाखल्यासाठी लढावं लागत आहे.