
PANDHARPUR | – उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिका सह अनेक मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. आषाढीच्या तोंडावर पाणी पातळीत वाढ झाली. तर नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत.