
WASHIM – नागरिकांना शासनाद्वारे वाटप करण्यात येणार रेशनचा शेकडो टन गहू पावसाने ओला झाला असून, ट्रेन द्वारे वाशिम येथे आलेले हा शेकडो टन गहू धान्यगोदाम वर सुरक्षित पोहचविण्याची जवाबदारी ही कंत्राटदाराची असते.
मात्र याठिकाणी बेजवाबदारपणे गहू ठेवण्यात आल्याने झालेल्या अवकाळी पावसात शेकडो टन गव्हाची नासाडी झाली आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा गहू मातीमोल झाला असून, या गव्हाची नुकसान भरपाई कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.