राष्ट्रीय
Trending

आरोपींच्या बापाचा बाप जरी आला तरी मॅटर दबू देणार नाही, आरोपींची नार्को टेस्ट करा, खतपाणी घालणारे मंत्री उघडे पडतील: संतोष देखमुख खून प्रकरणात संघर्षयोद्धा मनोज जरांगेंनी तोफ डागली

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपींचा आकडा ५० ते ६०- जरांगे

परभणी, दि. ४ – सरपंच संतोष देशमुखची अतिशय क्रुर पद्धतीनं हत्या झाली, हा डावचं आहे. शंभर टक्के सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालताहेत. कारण आरोपी इतक्या दिवस लपून राहात आहेत. काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवताय. अरे यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला ना दबुच देत नाही मॅटर आम्ही, असा गंभीर आरोप संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला. परभणीत मूक मोर्चा प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. खंडणी आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. आरोपींचा आकडा ५० ते ६० पर्यंत जावू शकतो. याशिवाय आरोपींना पळवून जाण्यापासून ते लपवून ठेवण्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा सर्वांना या खूनाच्या गुन्हात जबाबदार धरून अटक करावी अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खंडणीतल्या गुन्ह्यातील आरोपींचीसुद्धा नार्को टेस्ट व्हायलाच पाहिजे. आणि आता जे आरोपी पकडले त्यांचीसुद्धा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. या प्रकरणात सरकारने कसलीही हयगय करता कामा नये. या प्रकरणात खूप मोठं रॅकेट आहे. कारण यांना जर पुण्यातच अटक होतेय, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातय  तर याचा अर्थ असा होतो की, सरकारचा आणि सरकारमधील कुठल्यातरी मंत्र्याचा  यास राजकीय प्रचंड पाठबळ आहे. त्यामुळं यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. या आरोपींना कोण सांभाळतय, यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं असा प्रश्नही जरांगे पाटलांनी उपस्थित केला.

संतोष देशमुखची अतिशय क्रुर पद्धतीनं हत्या झाली. आणि आरोपींना सांंभाळण्यात यांना मोठेवण वाटतय.. हे कोण आहेत नेमके, यांना आरोपींना भाकरी खाऊ घालाव्या वाटतात, आरोपींना सांभाळावं वाटतं, आरोपींना ऐशोआरामाचं जीवन द्यावं वाटतं, आरोपींनं कुणाच्या तरी लेकीच्या बापाचा क्रुरपणे खून केलाय. त्यांना तुम्ही सांभाळताय, त्यामुळे सरकारनेही त्यांना पाठिशी घातलं नाही पाहिजे. कारण हे सगळच्या सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठ. खंडणी आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर शंभर टक्के सरकारचे कोण कोण मंत्री, आमदार यात येणार आहे.

हा डावचं आहे. शंभर टक्के सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालताहेत. कारण आरोपी इतक्या दिवस लपून राहात आहेत. काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवताय. म्हणजे सुटून जाण्याचा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा. याच्यात सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजे. जेणेकरून हे यांना शिकवताहेत. तू असा पळ, तू असा लपून बस, इतक्या दिवसांनी अटक होतेय आणि पुण्यातच अटक होतेय. म्हणजे आता तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं आहे का, आतापर्यंत बीड जिल्ह्याचं नाव बदनाम केेलं तुुम्ही आणि आता तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं आहे. हीच ह्यांची यापाठिमागची भूमीका आहे. आणि हे आरोपींना शिकवताहेत. शंभर टक्के हे खरंय.

अरे यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला ना दबुच देत नाही मॅटर आम्ही. तुम्ही लपताहेत ना. आता बघा सीआयडीला, एसआयटीला आणि पोलिस प्रशासनाला जे जे चोकशी करताहेत ना. यांनी नसतं ऐकून घेवू नका. हे कोण साखळी आहे ना ही सगळी साखळी मधी घ्या. महाराष्ट्रातल्या पोलिस प्रशासनाला आणि गृहमंत्र्यांना सांगणं आहे इथून पुढं असा खून करणार्याला कोणी सांभाळणार नाही म्हणून हे जे लपून ठेवत होते ना यांना पहिलं मधी टाका. यांना सोडू नका कारण हे सुद्धा खूनाला जबाबदार आहे. तुम्ही आरोपी लपून ठेवतात. म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात. इकडं खून करायचा आणि तिकडं आरोपीला लपून ठेवायचं. म्हणजे लपवून ठेवणारेही तितकेच हत्येला जबाबदार आहे.  यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्यावालेसुद्धा यास जबाबदार आहे.  एखाद्याचं लेकरू गेलंय याचं यांना दुखच नाही. खून करणारा आरोपी कसा घेवून पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं, त्याला सांभाळायचं ही भूमीका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाही. म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे.

आरोपींचा आकडा ५० ते ६० जणांवर जाऊ शकतो. कारण हत्या खंडणीमुळं झाली. याला खंडणी मागणारा जबाबदार आधी. यातून खून झाला. या आरोपींचे मोबाईल रेकॉर्डही आता पोलिस प्रशासनाकडे आले असतील. कारण हे खंडणीमधल्यांनी खून करायला लावलाय. खंडणी आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. कारण याच्यात कोणत्या मंत्र्यान, कोणत्या आमदारानं, सरारमधला मंत्री आहे का एखाद दुसरा की यांनी या आरोपींना बळ दिलं खंडणी मागायला आणि खून करायला, हे समोर येणं गरजेच आहे. जे जे आरोपींना गाड्यात घेवून पळाले, ज्यांनी ज्यांनी यांना घरी लपवून ठेवलंय, ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळलंय. म्हणजे सांभाळणार्याला दुखच नव्हतं. सांभाळणार्यांना आरोपींची माहिती पोलिसांना द्यावीच वाटली नाही का, म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना परभणीतून जाहीरपणे सांगतो की, तुम्हाला हे करावं लागणार. साखळी पकडावीच लागणार आणि सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावीच लागणार, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!