
JALGAON |चोपडा तालुक्यात मान्सून पूर्व मशागतीत शेतकरी वर्ग शेतातील विविध काम करताना दिसत आहे. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी वादळी वारासह पाऊस झालेला आहे. तसेच ढगाळ वातावरण तालुक्यात असल्याने शेतकरी पावसाळा सुरू होण्याआधी मशागत करताना दिसत आहे. परंतु शेतात कुठलं पीक पेरणी करावी. अशी व्दिधा मनस्थिती शेतकऱ्या पुढे पडली आहे. कारण कापूस पेरणी केली तर उत्पन्न व भाव नसल्याने लागलेला खर्चही निघत नाही.
मकाच देखील खरिपाचे उत्पन्न कमी येत असल्याने वाढलेल्या बी बियाणे खत फवारणी ची किंमत यामुळे शेतकरी काय करावं, या द्विधा मनस्थितीत आहे. तालुक्यातील यावर्षी खरीप पेरणी विना बरीच शेती चे क्षेत्र पडणार आहे. आणि त्या क्षेत्रात रब्बीची पेरणी करून उत्पन्न घेण्याचे मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. खरीप च्या हंगाम शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विचार करावा लागत आहे. परंतु पाऊस सुरू होण्याआधी मशागत करून ठेवावे, यासाठी शेतकरी शेतात बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करताना दिसत आहे.