
– पंढरपूर शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले. मेघगर्जनेसह सुमारे दोन जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पंढरपूर शहरात पाणीच पाणी झाले. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर दुसरीकडे ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे डाळिंब, केळी आंबा पिकाला फटका बसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला आहे.