
NAGPUR बच्चू कडू
– राज्य असो की केंद्र सरकार, यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही. राज्य विकण्याचा यांचे धोरण आहे. त्यामुळे बच्चू कडू त्यांच्यासाठी काही विषयच नाही. बच्चू कडू त्यांच्या महायुतीचे भाग होते, तरी त्यांच्याबद्दल महायुतीला सहानुभूती नाही.
ELECTION COMMISSION
– आम्ही निवडणूक आयोगाला पहिल्या दिवशीपासून प्रश्न विचारात आहोत. महाराष्ट्राचा सरकार जनतेच्या मनातला नाही. या सरकारला बच्चू कडू सारख्या अनेकांच्या जीवनाशी काही देणंघेणं नाही.
महायुती
– राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे असो, किंवा शिवसेनेचे शिरसाट असो, अनेक नाव घेता येतील. या सरकारमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा आहे, यांच्यात एकमत नाही. फक्त राज्य कसा लुटता येते यासाठी हे कामाला लागले आहेत. त्याबाबतीत हे एकाच माळेतील मणी आहेत.
सुप्रिया सुळे PM स्तुती –
– तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याबद्दल प्रतिक्रिया देता येणार नाही.
संजय राठोड
– भाजपला संजय राठोड हवे हवेसे वाटत नाही, तर त्यांना सत्ता हवी आहे. त्यामुळे भ्रष्ट आणि बदनाम लोक सत्तेचे वाटेकरी झाले आहेत. भाजपच्या सत्तेच्या हव्यासाचे परिणाम आपण पाहत आहोत.
काँग्रेस
– सध्या मी गोंदिया भंडारा जिल्ह्यात बँकेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. महाराष्ट्र संघटनेत काय सुरू आहे, त्याची फारशी माहिती नाही. सध्या मी मुंबईलाही जात नाही. जेव्हा पक्षाची मीटिंग होईल, तेव्हा त्या संदर्भात बोलू.
बच्चू कडू काँग्रेस समर्थन
– प्रदेशाध्यक्ष त्यासंदर्भात बोलतील.
मोदी सरकार
– अकरा वर्षात देशाला किती बुडवलं, किती कर्जात आणलं, याची माहिती का देत नाही. निवडणूकजीवी भाषणजीवी आणि जुमलेबाजजीवी भाजप ला फक्त सत्ता ताब्यात घेणे एवढेच काम आहे. पंतप्रधान पासून खालच्या कार्यकर्त्यापर्यंत ते तसेच आहेत.
महानगरपालिका
– नागपुरात महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकेल, अशी मानसिकता जनतेची आहे. आमच्या मित्र पक्षांची मानसिकता काय, स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता काय, त्यानुसार आघाडीचातेव्हा निर्णय घेऊ.