“राहुल गांधी अजूनही पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीयेत” चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

NAGPUR | राहुल गांधी आरोप/ लेख
– पराभवाच्या मानसिकतेतून राहुल गांधी अजूनही बाहेर येत नाही
– राहुल गांधी यांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, लोकसभा जिंकल्याच्या नादात 31 जागा त्यांना मिळाल्या 17 जागा आम्हाला मिळाल्या, त्यावेळी राहुल गांधी ओवर कॉन्फिडंट झाले,
– निवडणूक जिंकण्याच काम आता घरोघरी जाण्याचा जनसंवादाच काम असतं ते विसरून गेले
– महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास केला मोदींच्या कामावर विश्वास केला
– आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने आम्ही 3 कोटी 17 लाखावर गेले आणि ते 2 कोटी 17 लाखावर आले, म्हणजे राहुल गांधी यांना करायला पाहिजे की आपले 33 लाख मत कमी झाले
– राहुल गांधी यांनी याचा अभ्यास केला पाहिजे की 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीला सात कोटी 29 लाख मतं महाराष्ट्रात मतदार होते
– महाराष्ट्रामध्ये 2009 च्या विधानसभा निवडणुकीला मतदान वाढवून सात कोटी 29 लाख मतदार झाले त्यावेळी त्यांचे सरकार होतं केंद्रात राज्यात त्यांचे सरकार होती मग हे 30 लाख मत कसे वाढले होत
– निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन नोंदणी केली होती याद्या दुरुस्त केल्या आहेत
– कामठी विधानसभेच्या काँग्रेसने आपल्या बुथवार 17000 मतांचे नोंदणी केली आहे, निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून सगळ्या भागात नोंदणी केली आहे, म्हणून कामठी विधानसभेत सातत्याने प्रत्येक वेळी तीन-चार निवडणुका बघा कामठी विधानसभा ही सब अर्बन होत आहे
– तीन विधानसभा निवडणुकीत कामठी विधानसभेत 30000 मत वाढली आहे, राहुल गांधी हे संभ्रमात आहेत त्यामुळे आम्ही आमचा पक्ष मोठी पडणारे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर लोकांकडे जातो आहे
– राहुल गांधी अजूनही पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीयेत तोपर्यंत असं वाटतं
– निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांचा कार्यकाळ संपला की पुन्हा नियुक्ती होते त्यात काही नवीन नाही
– काँग्रेसच्या नेत्यांनी कामठी त्यांच्या बुथवर 17000 मत वाढवली आहे माझ्याकडे आकडेवारी आहे
– राहुल गांधींनी कामठी विधानसभेत यावं लोकसभा सोडून विधानसभेत यावा त्यांच्या पतनाचे दिवस आहेत त्यामुळे ते पिसाळलेले आहेत ते असं बोलत राहतात मी 2009 चा संदर्भ दिला आहे त्या संदर्भात त्यांनी बोलावं
– मतदार नोंदणी ही प्रक्रिया आहे त्यामुळे निवडणूक आयोगावर आणि भाजपवर बोलायची सवय त्यांनी सोडली पाहिजे
– अभ्यास करत नाही, राहुल गांधींनी अभ्यास करायला पाहिजे, नागपुरात येऊन बघायला पाहिजे, कामठी विधानसभेचा पंधरा वर्षाचा इतिहास बघितला पाहिजे कामठी विधानसभेत गेल्या अनेक निवडणुकीतला ट्रेंड बघायला पाहिजे
– कामठी मध्ये प्रत्येक विधानसभेत तीस हजार मतांनी वाढ होत आहे
– एखादी विधानसभा का वाढते, पनवेल विधानसभा साडेसहा लाखांवर गेली, पिंपरी चिंचवड साडेपाच लाखांवर गेली आहे, सेमी अर्बन झाल्याने सातत्याने वाढ होत आहे अशा पंधरा विधानसभा आहेत ज्या वाढ होत आहे
– आपल्या पाच वर्षात मोठी वाढ होते कामठी विधानसभेची मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे वाढ कुठे आहे तर पनवेल पिंपरी चिंचवड यासारख्या विधानसभेत वाढ होत आहे
राज- उद्धव युती
– राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे की नाही हा त्यांचा मुद्दा आहे, त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता मुभा आहे, राज ठाकरेंनी कोणासोबत जाव हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे, अजूनही कोणासोबत जावा त्यांचा अधिकार आहे
– भाजपला त्याचं काय औचित्य आहे आणि लोकांनाही रस नाही, कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाही
– मतदार कधी असा बांधला जातो, मतदार हा विकासाच्या मुद्द्यावर मत देतो मतदारांना माहिती आहे की देशात डबल इंजिन सरकार आहे
– डबल इंजिन सरकार असल्याने मतदार मतदान विकासावर करतात
– मुंबईचा डेव्हलपमेंट प्लान मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केलाय तो जनतेसमोर जातो त्यावेळी मतदान करतात, लोक विकासावर मतदान करतात आणि पुढचे 15 वर्ष राहुल गांधी आणि सर्वांनी विसरून जा, पुढचा काढा विकासाचा काळ आहे आणि या काळात तुम्ही नोंद डेव्हलपमेंट विजन असलेल्या लोकांना जनता मतदान करणार नाही
– मतदार कधीच कुणाचा बांधला नसतो मतदार हा विकासावर मतदान करतो आणि आताही मतदान विकासावर होईल
– मला असं काही बोलायचं नाही मला एवढेच बोलायचं आहे की राज आणि उद्धव यांना एकत्र यायचा आहे की नाही त्यांन बाबत आमचं बोलणं योग्य नाही
शरद पवार
– शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा बघितला पाहिजे, आमच्या पार्टीत आणि महायुतीत प्रचंड मजबुती आहे, आम्ही बरोबर लढणार आहोत आणि ज्यावेळी मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर मैत्रीपूर्ण लढू पण या ठिकाणी त्यांची महायुतीच लढून येणार आहे पुढचे पंधरा वर्षे त्यांनी सत्ता कारण सोडलं पाहिजे
जालिंदर सुपेकर
जालिंदर सुपेकर प्रकरणे चौकशी सुरू आहे, चौकशी होईल