महाराष्ट्र
Trending

 ठाण्यातील नाले सफाई वरून जितेंद्र आव्हाड आक्रमक महापालिकेला सुनावले खडे बोल

राबोडीतील नालेसफाई पाहणी दौऱ्यात नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली

THANE – सध्या ठाण्यातील नालसफाई वरून विरोधक आक्रमक झाले असून, महापालिका प्रशासन तसेच ठेकेदारांवर ताशेरे ओढले जात आहेत. ठाण्यातील राबोडी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नाल्याची पाहणी करत असताना तक्रारींचा पाढा आव्हाडांकडे घेऊन आलेल्या महिलांवर नजीब मुल्ला संतापले. आ. जितेंद्र आव्हाड पाहणी करत असताना नजीब मुल्ला यांची एंट्री झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. नजीब मुल्ला यांनी आव्हाड राजकारण करण्यासाठी इथे आले असल्याचा आरोप केला, तर या नालेसफाईचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर एकेकाळी गुरुशिष्य म्हणून नावाजलेली जोडी वेगळी झाल्याने विधानसभा निवडणुकीत देखील गुरु शिष्याचा संघर्ष आमने-सामने पाहायला मिळाला. मात्र, या संघर्षात आव्हाड यांनी बाजी मारली. मात्र, ज्या विभागातून नजीब मुल्ला नगरसेवक म्हणून निवडून येतात त्यांच मतदारसंघात आव्हाड नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आल्याने नजीब मुल्ला चांगलेच संतापलेले दिसले. नजीब मुल्ला अचानक आल्याने काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी सर्व नाल्याच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आव्हाडांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केले.

 

Back to top button
error: Content is protected !!