महाराष्ट्र
Trending

जालना तालुक्यात वादळी वाऱ्याने घरांची पत्रे उडाली, घरांवर झाडे कोसळली !

जालना तालुक्यातील सेवली तांडा येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान

JALNA |  – जालना तालुक्यातील सेवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या सेवली तांडा येथे आज दिनांक 07 शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामध्ये घरांची पत्रे उडाली असून घरांवर झाडे कोसळली. पत्रे उडाल्याने अनेक घराच्या जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. सेवली ग्रा.पं.चे सरपंच गणेश मोरे, माजी सरपंच शेख नवीद भाई व ग्रामपंचायत सदस्य सचिन साकला यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तहसीलदार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करावा व नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!