महाराष्ट्र
Trending

खंडणीप्रकरणी वाल्मिक कराड शरण येणार ? सीआयडीने लगाम कसला, आरोपींची बॅंक खाती गोठवली ! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी अ‍ॅक्शन मोडवर !!

छत्रपती संभाजीनगर – पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती मिळत आहे. वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल असला तरी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या खूनाचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. गुन्हा दाखल होताच वाल्मिक कराड फरार झाला असून त्याचं शेवटचं लोकेशन हे मध्यप्रदेश उज्जेनमध्ये मिळून आलेलं आहे. सीआयडी अ‍ॅक्शन मोडवर असून सगळेच मार्ग बंद झाल्याने वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या तीन फरार आरोपींसह खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड या आरोपींची बॅंक खातीही गोठवली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार अशी त्यांची नावे आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर केवळ पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. परंतू वाल्मिक कराड हे या खून प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील फरार चार आरोपींची बॅंक खाती गोठवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार चार फरार आरोपींची बॅंक खाती गोठवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजी व जाणीवपूर्वक आरोपींना पाठीशा घातल्याचा आरोप झाल्यानंतर सदरचे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. सीआयडीने हे प्रकरण हातात घेताच तपासाची चक्रे फिरवली. तब्बल ९ पथक व १५० जणांनी या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवली आहे.

दरम्यान, आतापर्यंत जवळपास १०० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली असून खून प्रकरणाचे धागेदोरे कनेक्शन सीआयडी तपासत आहे. वाल्मिक कराड यांच्यावर केवळ पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. परंतू वाल्मिक कराड हे या खून प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मीक कराड सध्या फरार असून त्यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे मध्यप्रदेशातील उज्जेन येथे होतं, अशी माहिती सूत्रांनी समजते. वाल्मिक कराड याने ११ डिसेंबर रोजी उज्जेनच्या महाकालचे दर्शन घेवून फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर १३ डिसेंबर नंतर वाल्मिक कराड यांचा मोबाईल बंद दिसून आला.

सुरुवातीला दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल असा-

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात अगदी सुरुवातीला शिवराज लिबराज देशमुख (वय 39 वर्षे व्यवसाय शेती, रा. मस्साजोग, ता. केज, जि.बीड) यांनी दाखल केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, दिनांक 09/12/2024 रोजी फिर्यादी शिवराज देशमुख हे पिसेगाव येथून दुपारी 03.00 वाजण्याच्या सुमारास धारूर चौकात आले असता, तेथे गावचे सरपंच जे की फिर्यादी शिवराज देशमुख यांचे आतेभाऊ संतोष पंडितराव देशमुख हे त्यांची चार चाकी टाटा ईडिगो गाडी घेवुन धारूर चौक, दांगट पेट्रोल पंपा समोर उभे होते.

फिर्यादी शिवराज देशमुख हे गाडी जवळ गेले असता सरपंच संतोष देशमुख त्यांना म्हणाले की, तुला मस्साजोगला यायचे आहे का, फिर्यादी शिवराज देशमुख यांनी होय म्हटल्याने त्यांना त्यांनी गाडी चालवयाला बसवले. दोघे केज येथून मस्साजोग कडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या पुढे आसलेल्या टोलनाक्या जवळ ते गेले असता टोलनाक्याच्या डाव्या साईडच्या शेवटच्या लाईन मधून जात असताना मधोमध समोरून एक काळ्या रंगाची स्कार्पिओ आडवी लावली.

त्या गाडीतून सहा जण खाली उतरले. त्यातील एकाने येवून फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या बाजुच्या दरवाज्याची काच दगडाने फोडून गाडीत पाहिले व दुस-या (डाव्या) साईडच्या बाजुला जावून संतोष देशमुख (सरपंच) यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली व त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये बळजबरीने बसवून केजच्या दिशेने निघुन गेले. सदर घटनेच्या वेळी पाठीमागे सिल्वहर रंगाची चार चाकी स्विप्ट गाडी थोड्या अंतरावर आली व केजच्या दिशेने परत निघुन गेली. त्यामध्ये काळ्या रंगाची स्कार्पिओ मधील मारेकर्यांचे साथीदार होते. दरम्यान या आशयाचा प्रथम माहिती अहवाल दाखल झाल्यानंतर या प्रकरणात नंतर खूप अपडेट झाले. सध्या या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलेली असून या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!