मराठीचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. शंभूराज देसाई
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद

-प्रताप सरनाईक यांच्या हिंदी भाषेबद्दलच्या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराजे देसाई यांनी सहकारी मंत्र्यांची पाठराखण केली आहे. हिंदी भाषिक भागात कार्यक्रम असल्याने त्यांच्या बोली भाषेत बोलावे लागते. मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे. मराठीचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. असा खुलासा कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीत बोलताना केला.
तर महायुतीमध्ये काय काडी टाकता येते का, यासाठी संजय राऊत यांचा प्रयत्न सुरू आहे. 2021-22 मध्येही त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचाकडचे सर्व अनुबॉम्ब संपले, मात्र महायुतीत ते आग लावू शकले नाहीत. अशी खोचक टीका शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीत बोलताना केली आहे. संजय राऊत यांना माध्यमच महत्व देतात, आम्ही नाही देत. असेही देसाई यांनी म्हणत राऊत यांनी फटकारले .
– अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, मंगळवारी याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मदतीबाबत निर्णय घेतील. असा विश्वास कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्यांचा म्हणायचं उद्देश हा कृषिमंत्री पद हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करणारे पद आहे. असे ते सांगत होते. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले