
JALNA – महावितरणच्या मस्तगड भागातील कार्यालयाने जालना पंचायत समितीचा वीजपुरवठा खंडित केल्याने, जालना तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयांची कामे रखडली आहेत. या प्रकारामुळे सरपंच संतप्त झाले.
या संतप्त झालेल्या सरपंचांनी मस्तगड भागातील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. वारंवार पंचायत समितीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा परीणाम ग्रामपंचायतींच्या कारभारावर होत असल्याचे सांगत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
दरम्यान यानंतर असा प्रकार घडणार नाही, असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सरपंचांनी घेराव आंदोलन मागे घेतले. दरम्यान पुन्हा वीज कानेक्शन कट केल्यास, महावितरण अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे.