शक्तीपीठ साठी 20 लाख कोटींचा कर्ज डोक्यावर घेत आहेत, हे कशासाठी? तर कमिशन काढण्यासाठी!
शक्तीपीठ महामार्ग हा मोठा भ्रष्टाचार - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

KOLHAPUR | * पुणे स्टेशन नाव बदलून काय देश मोठा होत नाही, हृदयात अस्मिता असायला हवी.
* रस्त्याचे नाव बदलायचे, स्टेशनचे नाव बदलायचे असे करून काहीही होत नाही.
* सध्या सरकार चालवणे अवघड झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहत आहोत
* शक्तीपीठ साठी 20 लाख कोटींचा कर्ज डोक्यावर घेत आहेत, हे कशासाठी? तर कमिशन काढण्यासाठी.
* वित्त विभाग असेल किंवा वित्तमंत्री काही असेल, तरी हा प्रोजेक्ट रेटून केला जाईल.
* समृद्धी महामार्गाचे झाले, तेच इथे करायचे आहे.
* हिंदी भाषेच्या मोर्चात सहभागी व्हायचे का नाही, हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील.
* केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शैक्षणिक धोरणावर निधी कमी केला असल्याने, दोन चे असो किंवा तीन भाषा असो शिकवायला साधनसामग्री नाही.
* शिक्षक हे नाहीत, इतके दुर्दशा झालेले असताना आपण भाषा वाढवत आहोत.
* या निरर्थकवादापेक्षा मूलभूत शैक्षणिक गरजेवर खर्च व्हायला हवा.
* मराठी ही मातृभाषा आहे, तर हिंदी राज्यभाषा आहे, आणि इंग्रजी ज्ञान भाषा आहे.
* एक राष्ट्र, एक भाषा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे हा गोंधळ सुरू आहे.
* काही काळानंतर हिंदी ही एकच भाषा देशात ठेवण्याचा घाट केंद्र सरकारचा आहे. आणि हे चुकीच आहे.
* भारत संशोधनामध्ये मागे पडलेला आहे, हे दिसत आहे. शस्त्र अस्त्र देखील आपण बाहेर न घेत आहोत.
* एक महाशक्ती होण्याचे जे आपलं स्वप्न आहे, ते केवळ एक स्वप्न राहील. जर संशोधन आणि शिक्षणावर पैसे खर्च नाही केले तर.
* 6% वरून 9% टक्क्यांवर विकास जायला हवा.
* RSS आणि भाजपचे एकच लक्ष आहे, एक भाषा, एक निवडणूक, एक देश
* हिटलरने जे युद्ध केले, त्यावेळेस त्यांनी जे सूत्र वापरले ते हे दिसत आहे.
* आपल्या देशात विविधता आहे, आणि ती जपायला हवी
* ठाकरे बंधू मोर्चामुळे एकत्र येत आहेत, असं नाही गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा सुरू आहे.
* घरातला वाद आहे, ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे.
* मात्र महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे घटक आहेत, ते कोणाबरोबर युती करायची ते त्यांचा प्रश्न
* हा सर्व विषय कमिशनखोरी साठी आहे, समृद्धी महामार्ग होत असताना देखील झाला
* यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, आता तसाच भ्रष्टाचार शक्तीपीठ महामार्गावरून करायचा आहे.
* आणीबाणी लागू झाल्यानंतर अत्याचार नक्कीच झाले आहेत
* इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, मात्र ती नियमानुसार ते आत्ता सुरू असलेल्या आणीबाणी सारखी नव्हती.