ठाकरे बंधू केवळ मुंबई महापालिका हातातून जाऊ नये म्हणून एकत्रित येत आहेत
बच्चू कडु

AMRAVATI |- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एकत्र येणार असल्याची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.
– दोन्ही पक्ष एकत्रित येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र ते मुद्द्यावर एकत्रित येत आहेत की राजकारणासाठी हे पहावे लागेल. त्यांच्या एकत्र येण्यातून महाराष्ट्राच किती भलं होणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. ते जर मुद्द्यावर एकत्रित आले असते तर वेगळा विषय असता. मात्र केवळ मुंबई महापालिका हातातून जाऊ नये म्हणून ते एकत्रित येत आहेत, असं दिसत आहेबच्चू कडू म्हणाले.
– महापालिकेच्या निवडणुका या पक्षाच्या बळावर होत नाहीत तर नगरसेवक म्हणून निवडून जाणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वावर या निवडणुका होत असतात.
– एकाच घरात दोघे दोघे उभे राहतात
– एक मनसे कडुन आणि एक शिवसेने कडुन तर त्यांच्या घरातून त्यांची सुन भाजप कडुन उभी राहील
– वेळेवर कसे उमेदवार येतात त्याच्या वर अवलंबून असते
– लोकसभा, विधानसभा सारखं पक्षीय ताकतीवर निवडणुका होत नाही बच्चू कडु यांची प्रतिक्रिया