महाराष्ट्र
Trending

आषाढी यात्रेपर्यंत भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात, वारकरी संप्रदायाची मागणी

PANDHARPUR |- सावळ्या विठुरायाच्या तुळशी पूजेमुळे सामान्य भाविकांना रांगेत ताटकळत तासनतास उभे राहावे लागत आहे. म्हणूनच आषाढी यात्रेपर्यंत विठ्ठलाच्या संपूर्ण तुळशी पूजा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तात्काळ बंद कराव्यात. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल, अशी मागणी आता वारकरी संप्रदायातून होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच भाविकांना दर्शन रांगेत ताटकळत उभी रहावे लागले. याबाबत भाविकांमधून नाराजी व्यक्त होत होती. यानंतर आता थेट तुळशी पूजा बंद करण्याची मागणी वारकरी संप्रदायात होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!