महाराष्ट्र
Trending

वाल्मिक कराड उर्फ आका आणि नितीन कुलकर्णी दोघे मिळून 17 मोबाईल वापरतात ! या मोबाईलमध्ये सगळे पुरावे सापडतील: आमदार सुरेश धस

आका आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी गायब झाला- सुरेश धस यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ – वाल्मिक कराड उर्फ आका आणि नितीन कुलकर्णी दोघे जण मिळून १७ मोबाईल वापरतात. या १७ मोबाईलमध्ये सगळे पुरावे सापडतील, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ पुण्यात काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधीत करताना आमदार सुरेश धस बोलत होते.

आमदार सुरेश धस उपस्थत जनसमुदायाला म्हणाले की, दोन मोबाईल वापरता असे किती जण आहेत. दोन मोबाईल वापरनारे नगन्य आहेत. पण आमचे वाल्मिक आण्णा उर्फ आका किती मोबाईल वापरतात. १७ मोबाईल नंबर वापरतात. बीडच्या एसपींना आणि सीआयडीचे जे आयजी साहेब यांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक कराड आका हे दोघे जण मिळून १७ मोबाईल वापरतात.

हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे की यांनी कुणा कुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या १७ मोबाईलमध्ये सापडतील. आणि आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे पुणे जिथे काहीच नाही उणे अशा ऐतिहासिक शहरांमधून ही मागणी मी करतोय. की मायबाप सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करतो, की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या, अशी कळकळीची विनंतीही आमदार सुरेश धस यांनी केली.

मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख आणि परभणी येथील युवक बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी या निष्पाप जीवांना मृत्यूपश्चात न्याय मिळवून देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व समाजघटकांनी मिळून पुकारलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालो. सदर दुर्दैवी घटनांमधील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारने सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा आमदार सुरेश धस यांनी उपस्थित जनसमुदायासमोर मांडली.

Back to top button
error: Content is protected !!