महाराष्ट्र
Trending

चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या निधीचा गैरवापर थांबवावा

डॉ. विनय नातू

RATNAGIRI | भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात कोकण ग्रामिण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या एकाच ठेकेदाराला दिलेल्या कामावर विनय नातू यांनी बोट ठेवले आहे.

सरकारच्या जीआर प्रमाणे पाच ते सहा गावांचा एक गट याप्रमाणे ३ ते ५ कोटी या मर्यादेपर्यंत कामांना मंजुरी द्यावी असा शासन निर्णय असताना, केवळ जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एकाच गावामध्ये कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम योजनेंतर्गत १४ कोटीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

कंत्राटदाराच्या भल्यासाठी ही कामे केली जात आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या निधीचा गैरवापर थांबवावा व या विषयाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!