महाराष्ट्र
Trending

राज्यात पुढील २४ तासात जोरदार पावसाचा इशारा !

मुंबईदि. २२ :   राज्यात पुढील २४ तासात रायगडरत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली असून दरड हटविण्याचे काम सुरु असल्याचेराज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२२ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात १९.८ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात १६.३ मिमीचंद्रपूर १२.३ मिमीठाणे जिल्ह्यात ११.१ मिमी  आणि रायगड जिल्ह्यात ९.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २२ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ११.१रायगड ९.४रत्नागिरी १६.३,  सिंधुदुर्ग ८.५पालघर १९.८नाशिक ५.४धुळे ०.२नंदुरबार ४.८जळगाव २.६अहिल्यानगर ०.३पुणे ३.४सोलापूर ०.४,  सातारा ५.२,  सांगली २.७,  कोल्हापूर ५.१छत्रपती संभाजीनगर ०.७जालना ०.६,  लातूर ०.८धाराशिव १.५नांदेड २.४,  परभणी ०.३हिंगोली ३.८बुलढाणा ३अकोला १.४वाशिम १.४ अमरावती १.१यवतमाळ ९.३वर्धा ४.२नागपूर १.४भंडारा ३.८गोंदिया २.२चंद्रपूर १२.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button
error: Content is protected !!