गुलाबराव पाटलांच्या खात्यात ४०-५० कोटी जमा झाले त्यामुळे ते अटकेच्या भीतीने पक्ष सोडून गेले
संजय राऊत यांचा आरोप

MUMBAI हिंदी सक्ती मुख्यमंत्री बैठक
– महाराष्ट्रावरती हिंदीची सक्ती हा एक महाराष्ट्राला महाराष्ट्र वरचा मराठी पण नष्ट करण्याचा आहे. हिंदीची सक्ती गुजरातला नाही किंबहुना अनेक वर्षांपूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी समोरच्या गुजराती जनतेला विचारला आहे तुम्ही हिंदीची सक्ती सहन करणार आहात का? हे मोदींच वक्तव्य आहे. का मग देवेंद्र फडणवीस हिंदीची सक्ती महाराष्ट्रावर का लादत आहेत?
– त्यांनी मराठी शाळा या अधिक प्रवीजात कशा होतील यासाठी त्यांनी कार्य केले पाहिजे. मुंबई सारख्या शहरांमध्ये महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. हे अतिक्रमण आहे. त्याच्यामध्ये आता हिंदीची सक्ती
– मी त्या सर्व कवी लेखक यांचा शिवसेनेतर्फे अभिनंदन करतो. हेमंत दिवटे यांच्यासारखे कवी आंतरराष्ट्रीय कवी त्यांनी त्यांचा राज्य सरकारचा पुरस्कार हिंदी शक्ती विरुद्ध परत करण्याची घोषणा केली. इत्यादी कवी आहेत महाराष्ट्रात अनेकांना राष्ट्रीय राज्याचे पुरस्कार मिळाले मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह महाराष्ट्राचा मराठी पण नष्ट करण्याचा जे कारस्थान चालू आहे, त्याविरुद्ध हे हत्यार उचलायला पाहिजे. म्हणून मराठी लेखक, कवी, अभिनेते यांनी हा जी भूमिका घेतली आहे. संदीप चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड भुमिका व्यक्त केली आहे आणि हे योग्य आहे
मनसे आंदोलन
– आंदोलन त्यांना करू त्यांना, आम्ही सुद्धा शिवसेना हा एक विरोधी पक्ष, उद्या काही काळात विधानसभा सुरू होत आहे. आणि विधानसभा ही सरकारला या संदर्भातला जाब विचारण्याचा योग्य व्यासपीठ आहे. सरकार हे हिंदीची दादागिरी करत आहे हे कोणासाठी करत आहात? मुंबईवरती आक्रमण वाढाव, मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राचे इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावा यासाठी हे चाललं आहे का?
– महाराष्ट्राला महाराष्ट्राचा मराठी पण नष्ट करायचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. आणि कोणाला तरी मुंबई घशात घालायची या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे. यासाठी जर ही कारस्थानात चालली असतील तर शिवसेनेचा जन्म आहे. या कारणासाठी झाला आहे ही शिवसेना विसरणार नाही. मराठी भाषेवर मराठी माणसावर न्याय हक्कांसाठी लढाई, मराठी भाषेवर अतिक्रमण वाढवणे यासाठी जन्म झाला आहे. आम्ही मराठी भाषे संदर्भात आमचा जे ऋण आहे ते आम्ही वाया जाऊ देणार नाही
– तो आमचा प्रश्न आहे तो आम्ही बघू आमची एक भूमिका आहे मराठी राजभाषा मातृभाषा हे टिकवावी लागेल तरच मराठी भाषा टिकेल 106 हुतात्म्याने जे बलिदान दिलं ते मराठी भाषेसाठी दिलंय, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना स्थापन केली ते मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केली शिवसेनेचा जन्म त्या कारणासाठी झाला
भास्कर जाधव
– भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. अत्यंत चाणाक्षणी आहेत
– शिवसेनेच्या काही काळात शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचे योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत त्यांचे जे भूमिका आहे ते मी वृत्तपत्रात वाचली
– बराच काळ ते त्यांच्या मतदारसंघात आणि कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवल्या
– भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात अशा आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे काय वेदना आहेत ते आम्ही नक्की समजून घेऊ ते आमचेच आहेत
– कोणाला वाटेल आमदार फुटून जावेद खासदार फूठून जावेत कोणालाही वाटणार नाही. शरद पवारच्या ते उदाहरण देत आहेत ते बरोबर आहे पण तरीही त्यानंतर अडीच वर्षांनी अजित पवार 40, 42 आमदार घेऊन गेले त्यांना शेण खायचाच आहे त्यांना स्वतःच्या तोंडात शेण भरायचा आहे गद्दारीचे ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आणि ज्यांच्यावर दबाव आहे ईडी सीबीआय पोलीस तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही
– उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला चर्चा केली, मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणे आणि आजार वेगळा होता हे मला माहिती आहे
– उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये 40-50 कोटी रुपये कुठून तरी जमा झाले होते त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत ज्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे होते. हे आजार आहेत दुखणे आहेत किंवा कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार
– भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार यांचे पण सोडून गेले, आमचे शिवसेनेचे पण सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस यांनी केलं
गुलाबराव पाटील विधान
– आता हा जो तुम्ही प्रश्न मला विचारत आहात त्याच काय मनावर घेता, पळून गेलेला डरपोक माणूस आहे शिवसेना नक्कीच हायजॅक केली. निष्ठावंत सैनिकांनी गद्दार गेले आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची हे निष्ठावंत शिवसेना आहे आणि ही हे त्यांच्या ताब्यात आहे ही लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र
माणिकराव कोकाटे विधान
– कोण नक्की बोल बच्चन आहे हे त्यांनी बघावं, मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलबच्चन त्यांचा आवडता शब्द आहे, हा बोल बच्चन तो बोल बच्चन
योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत कर्जमाफीचा आणि आम्ही त्यांना म्हणालो शेतकऱ्यच्या आत्महत्येचा आकडा पुढल्या महिन्यात एक लाख झाल्यावर करणार आहात का? का विक्रमी आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्यावर त्यानंतर ते कर्जमाफी करतील व लाडकी बहिणींना २१०० रुपये देतील