महाराष्ट्र
Trending

बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित ! शेतकऱ्यांची रात-पहाटची डोकेदुखी बंद, 6 गावांतील 1100 कृषिपंपांना आता दिवसाही वीजपुरवठा !!

जालना : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून उभारण्यात आलेला बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील सौर ऊर्जा प्रकल्प बुधवारी (1 जानेवारी) कार्यान्वित करण्यात आला.

आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते फित कापून या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी यावेळी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, जालना मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय सरग, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा प्रमुख अनिल कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास मदन, एमईआयएलचे महाव्यवस्थापक अभिषेक गांगुली यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जगताप, पं.स. सदस्य तथा भाजपाचे जिल्हा चिटणीस हरिश्चंद्र शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान मात्रे, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस गणेश कोल्हे, तालुकाध्यक्ष भगवान बारगाजे, नगरसेवक पद्माकर जऱ्हाड, शिवसेना तालुका संघटक भगवानराव मदन, सरपंच कैलास मदन, उपसरपंच कैलास दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या योजनेत महावितरणच्या उपकेंद्राच्या 5 किमी परिघातील जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्याने शासकीय जमिनी घेण्यात येत आहेत. केळीगव्हाण येथील 5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पातून परिसरातील 6 गावांतील 1100 कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.

यावेळी आ.कुचे म्हणाले की, मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण होऊन त्यांना दिलासा मिळाला आहे. या योजनेतील जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प बदनापूर मतदारसंघात सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी आपण जागा मिळवून दिली. तसेच या योजनेसाठी महावितरणाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्य अभियंता कछोट म्हणाले की, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कृषिपंपांना ऑटोस्विच लावल्यामुळे ट्रान्सफॉर्मर व उपकेंद्रावर विजेचा भार वाढतो. हा भार कमी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑटोस्विच काढून पंपास कॅपॅसिटर बसवावेत, जेणेकरून व्होल्टेज सुधारून सुरळीत वीजपुरवठा होईल.

Back to top button
error: Content is protected !!