महाराष्ट्र
Trending

अवैद्य रेती उत्खनन झाल्यास जिल्हाधिकारी, तहसीलदार तलाठी यांच्यावर कारवाई करणार !

PARBHANI |  – राज्य सरकारने नवीन असे वाळू धोरण आणले आहे. त्यामध्ये ज्यांचे घरकुलाचे बांधकाम आहे, त्यांना पाच ब्रास पर्यंत वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा जिल्ह्यामध्ये होत असल्याच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.

येथून पुढे जर अवैद्य वाळू उपसा करण्यात आला, तर त्या ठिकाणचा तलाठी तहसीलदार यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचा इशारा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे.

त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विकास कामांवर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या.

Back to top button
error: Content is protected !!