
NAGPUR | शिव भोजन थाळी अनुदान रखडले आजच्या महागाईत गरिब मजूर कामगारांना हक्काचं भोजन मिळावं, यासाठी 10 रुपयात भोजन देण्याची योजना होती. आता हे पैसे सरकारला देणं शक्य होत नाही, म्हणजे सरकारची स्थिती ही भिकाऱ्यासारखी झालेली आहे.
– लाडकी बहीण ही योजना आणल्यानंतर अनेक योजनांना कात्री लागली. आदिवासी विभाग, समाज कल्याण, विभाग ओबीसी विभाग या विभागाचे पैसे लाडक्या बहिणीसाठी वळवले गेले
– लाडक्या बहिणीसाठी पैसे नव्हते तर तुम्ही कर्ज काढायला पाहिजे होतं. पण या योजनासाठी कर्ज काढायला पाहिजे होते.पण या योजना बंद करणे योग्य नाही. सध्याच्या घडीला महाराष्ट्रावर दहा लाख कोटी इतकं कर्ज झालेल आहे. तेच अदानीला अकराशे एकर जमीन जी दोन लाख कोटी रुपयांची जमीन दिली आहे.
– हे दोन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी वापरले असते. पण महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम होत आहे. या सरकारला काही देणं घेणं आहे का? सहा महिन्यापासून त्यांना अनुदान मिळालं नाही. सरकारने किमान सांगून टाकावं आमची औकात नाही आम्ही देऊ शकत नाही. हे सरकारचा पाप आहे आणि यांचा बापाचा घडा आता भरला आहे.
भाजप निवडणूक तयारी
– महाराष्ट्रात या सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे तयारी करून काही उपयोग नाही. निवडणूक दिलेली आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे जनता निवडणुकीची वाट पाहत आहे.
मुख्यमंत्री बैठक
– प्रशासकीय अधिकार मुख्यमंत्र्यांच्या असल्याने ते किती ब्रेक लावतात ते पाहावे लागेल.